May 29, 2025 क्रोनिक किडनी डिसिज (CKD) – एक गंभीर पण आयुर्वेदाद्वारे रोखता येण्याजोगा आजार…!CKD – क्रोनिक किडनी डिसिज म्हणजे मूत्रपिंडांची कार्यक्षमता हळूहळू कमी होणे. ही एक दिर्घकालीन स्थिती असून ती सहसा हळूहळू वाढत जाते. मूत्रपिंडा द्वारे शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्याचे, electrolyte balance – पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे आणि रक्तदाब सांभाळण्याचे महत्त्वाचे कार्य केले जाते. CKD झाल्यास ही कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते. किडनीचे काम जस जसे कमी होईल तसे रक्तातील टाकावू – विषारी पदार्थोंचे प्रमाण वाढू लागते, जसे की Sr Creatinine, Sr.Uric Acid, Sr.Urea, Sr. Pottasium.आणि त्यामूळे शुद्ध रक्ता सोबत या विषाक्त पदार्थांचाही पूरवठा शारीर अवयवांना होवु लागतो. आणि त्यामूळे इतर चांगल्या अवयवांची ही कार्यक्षमता कमी होऊ लागते.CKD – किडनी निकामी होण्याची कारणे:CKD होण्यामागे अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी मुख्य म्हणजे:1. मधुमेह (साखरेचा आजार): दीर्घ कालिन टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेह हे CKD चे सर्वात सामान्य कारण आहे.2. उच्च रक्तदाब: नेहमी रक्तदाब जास्त राहात असल्यानं मूत्रपिंडांवर ताण येतो.3. जंतुसंसर्ग : मूत्रपिंडांवर वारंवार होणारे संसर्ग.4. जन्मत : किंवा अनुवंशिक कारणे:गर्भाशयात गर्भ निर्मिती होताना बिज दोष किंवा गर्भावस्थेत चुकीचा आहार विहार आदि कारणाने जन्मत: किडनी विकार असू शकतात . कधी कधी CKD कुटुंबामध्ये आनुवंशिकतेने हि होतो.5. Medicine अतिवापर: काही वेदनाशामक औषधे (जसे की ibuprofen) दीर्घकाळ घेतल्यास मूत्रपिंडांना नुकसान होऊ शकते.तसेच किमोथेरेपी – रेडिएशन – जुटान आजारासाठी दीर्घकाल औषधी उपचार आदि कारणाने किडनी वर परिणाम होतो.6.अयोग्य आहार: नासलेले – सडलेले खराब अन्न आदि दूषित आहार, विरुद्ध आहार, अयोग्य वेळी आहार सेवन, चुकीच्या प्रमाणात आहार घेणे इत्यादी कारणाने अपचन होऊन शरीराचे metabolism बिघडते. त्यातून शरीरात अधिक प्रमाणात आम किंवा विषारी द्रव्य तयार होतात. जी शरीरातून सहजतेने बाहेर पडत नाही.रक्तात फिरत राहतात. किडनीमध्ये रक्ताचे फिल्ट्रेशन होत असतात, किडनीचे फंक्शनल युनिट असलेल्या नेफ्रॉन ला जखमा तयार करतात. यातून किडनी चे काम कमी होत जाते.7. विषारी पदार्थाचे सेवन : प्रिजर्वेटिव, केमिकल युक्त मसाले -चटनी -स्वास आदि, केमिकल युक्त मद्यपान – drugs, सॉफ्ट ड्रिंक, स्वीटनर इत्यादि. अधिक सेवन.किंवा आत्महत्या आदि प्रयोगात विष प्राशन याने शरीरात गेलेली विष द्रव्य ही किडनी मधून बाहेर पडताना नेफरॉन injury करतात.8. वेगावरोध: मल (शौचास), मूत्र(लघवीला), वायु (पाद) वेग आला असेल आणि तो बलपूर्वक अडवून ठेवला जात असेल किंवा ठेवण्याची सवय असेल तर याचाही किडनीच्या कार्यावर परिणाम होतो.स्त्रियांमध्ये पाळी आडवण्याची औषधी घेऊन पाळी अडवणे किंवा इतर काही कारणाने पाळी न येणे यासारखी कारणे ही किडणीच्या नियमित कामावर परिणाम करतात.CKD आजाराची लक्षणे:प्रारंभिक टप्प्यात शरीर स्वतः हून किडनी बरी करण्यासाठी प्रयत्न करत असते. त्या काळात कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसून येत नाहीत. परंतु व्यक्ती कडून आजार होण्यासाठी असलेले कारण घेणे चालूच असेल तर आजार पुढच्या टप्यात जातो. आजार पुढे गेल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात:थकवा आणि अशक्तपणा (Fatigue and Weakness) * शरीरात सूज (Swelling in legs, ankles, or feet) * लघवीमध्ये बदल (Changes in urination frequency) * उलटी आणि मळमळ (Nausea and Vomiting) * भूक न लागणे (Loss of Appetite) * त्वचेला खाज येणे (Itching) * श्वास घेण्यास त्रास (Shortness of Breath) * झोप न येणे (Difficulty Sleeping)निदान (Diagnossis ) :लघवीला होणारी जळजळ, लघवी होण्याचे प्रमाण, लघवीचा रंग – वास, लघवी करताना होणारा फेस आदि गोष्टी वरून रुग्णाला स्वतः ला किडनी चे काम बिघडले असल्याचे कळू शकते.Investigation: – eGFR – RFT/KFT (Renal/Kidney function test) – Sr Electrolyte – Hemogram या Blood Test द्वारे या आजाराचे निदान होते.पोटाच्या सोनोग्राफी/MRI/CT scan द्वारे किडनीचा आकार , अडथळे आणि Parenchyamal Stage समजते.लघवीच्या तपासणीत मूत्र मार्गातील जंतु संसर्ग – Protin loss समजतो.या सर्व तपासण्याद्वारे आपण किडनीचे काम कसे चालू आहे याचा अनुमान काढू शकतो.Tratment (उपचार):आजच्या Allopathic Science – या आधुनिक शास्त्रानुसार, CKD हा आजार कधीच बरा होत नाही, वाढत जातो त्या मध्ये सुधारणा होऊ शकत नाही. म्हणजे Irreversible आहे असे म्हटले आहे.उच्च रक्तदाब आणि साखर नियंत्रणात ठेवणारी औषधे, नियमित डायलिसिसने तो नियंत्रित ठेवन्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, जर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घरातील कुणाला तरी बरोबर घेऊन हॉस्पिटल वारी करणे, injection टोचवणे, शरीर मशीनला जोडून 4-5 तास झोपून राहणे, सोबत मिळणारी ताप – थंडी, थकवा, अंगदुखी खुप त्रासदायक आहे. शिवाय सोबत आर्थिक खर्च ही मोठा होत असतो.मूत्रपिंड प्रत्यारोपण: पुढे अंतिम टप्प्यावर Kidney Transplant – मूत्रपिंड प्रत्यारोपण हाच एकमेव उपाय सांगितला जातो. परंतु – किडनीचा डोनर न मिळणे,किडनी डोनर मिळाला तर किडनी ट्रान्सप्लांट साठी अत्यंत खर्चिक आणि दीर्घकाळ उपचार, – एवढा खर्च करूनही बऱ्याचदा दुसऱ्याची किडनी शरीरात मॅच होत नाही.– आणि सगळ्यात महत्त्वाचे kidney Transplant यशस्वी झाल्यावर देखील त्या बदललेल्या किडनीची 10 ते 15 वर्ष तिची वैधाता सांगितली जाते.म्हणजे त्यानंतर ही पुन्हा पहिले दिवस येऊ शकतात. अशा अडचणी येतात.हे CKD आजारा बाबतीत ऍलोपॅथी शास्त्राची मर्यादा आहे.आता आयुर्वेद शास्त्रा बद्दल बोलू,आयुर्वेद ग्रंथात वर्णन केलेल्या 13 प्रकारच्या मूत्रकृच्छ व्याधीच्या संप्राप्तीचा विचार करून त्यानुसार CKD वरती आयुर्वेद उपचार केली जाते.आयुर्वेद शास्त्रात मात्र CKD वरती खुप सुंदर Result पहायला मिळतात.मात्र आयुर्वेदात किडनीवर अभ्यास असलेल्या तज्ञ डॉक्टरांकडून, केवळ वनस्पति जन्य (हर्बल) औषधीद्वारे उपचार आणि पथ्य पालन करणे आवश्यक आहे.तज्ञ डॉक्टर: *डॉ. प्रशांत खाडे*M. D. (AYURVED), F.I.C.H. ,Ph.D. – Research Study Chronic Kidney Disease (CKD).यांच्या मार्गदर्शना खाली हिलवाईब आयुर्वेद सुपर स्पेशालिटी किडनी केअर सेंटर, पिंपरी पुणे द्वारे,वनस्पतिजन्य (पूर्णत: हर्बल ) आयुर्वेद औषधी व आहार विहार याद्वारे उपचार करताना आम्हाला खुप उत्तम रिसल्ट दिसत आहेत. योग्य वेळी उपचार घेतलेल्या 20 -25 % रुग्नामध्ये Lab report पूर्णत: normal होऊन पथ्य संभाळत हे रुग्न सामान्य जीवन जगत आहेत. 30- 35 % रुग्न डायलेसिस मधुन बाहेर आले आहेत. रुग्न क्लिनिकली पूर्णत: नॉर्मल असुन आयुर्वेद मेडिसिन व पथ्य संभाळत यांचे Sr Creatinine 2 ते 4 दरम्यान स्थिर राहत आहे.तर 30 – 35% रुग्नांचे आठवड्यातून होणाऱ्या डायलेसीस ची संख्या कमी करण्यात आम्हाला यश मिळत आहे. साधारन 15 – 20 % रुग्णांमध्ये Failure आहे. त्याची कारणे ही तशीच आहेत,– रुग्नाला सांगितल्या प्रमाणे आहार – विहार संभाळता न येणे.– आयुर्वेद Medicine घेण्यास आळस – धैर्य नसल्याने अर्ध्यातच उपचार थांबवणे.– फार क्वाचित आयुर्वेद मेडिसिन सूट न होणे.– जन्मत: गंभीर आजार असणे.– अनियंत्रित मधुमेह – अति प्रमाणात केमिकल औषधी चे सेवन – मद्यपान आदि व्यसन या मुले किडनी injury न भरण्या सारखी असणे. इत्यादी कारणे आहेत.डॉ प्रशांत खाडे सरांनी 2009 पासून आजपर्यंत 2100 पेक्षा अधिक CKD रुग्णांना आयुर्वेद उपचार दिलेले आहेत.यामध्ये वापरली जाणारी औषधी ही पूर्णतः वनौषधी असतात. आयुर्वेद वैद्यांच्या देखरेखीत वनस्पतीच्या काढयाची खलात भावना देऊन औषधीची गुणवत्ता वाढवली जाते. यात कुठल्याही प्रकारचे खनिज द्रव्ये किंवा केमिकल नसते. ही औषधी व पथ्य किडनीच्या आजाराच्या मूळावर काम करणारी असून, कुठल्याही प्रकारचे side effects याने होत नाहीत.विशेष म्हणजे, आयुर्वेद उपचार देताना, आधी पासून चालू असलेले Allopathy उपचार – डायलिसिस लगेच बंद केले जात नाही. आयुर्वेद उपचाराने जस जसे रुग्णामध्ये क्लिनिकली व लॅब रिपोर्ट मध्ये बदल होत जातील, तसे तसे टप्या टप्याने Allopathy उपचार – डायलिसिस Allopathy Physicians डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी करत करत बंद केले जाते.पुढच्या टप्प्यात आयुर्वेद औषधी ही बंद केली जातात.हे उपचार करताना, औषधी सोबत पथ्ये पालन खुप गरजेचे आहे. जेवढे पथ्य पालन व्यवस्थित होते, तेवढा रुग्ण लौकर बरा होऊ लागतो. निष्कर्ष:CKD ही एक गंभीर पण नियंत्रणात ठेवता येणारी स्थिती आहे. वेळेवर निदान आणि योग्य ठिकाणी अनुभवी व तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांद्वारे आयुर्वेद उपचार केल्यास रुग्णाचे जीवनमान चांगले राहू शकते.लेखक:*Dr Saurabh B Kadam*M. D. (AYURVED), Puneआयुर्वेद व पंचकर्म तज्ञ(सन 2015 पासून, आप्तश्री आयुर्वेद, पुणे व Healvibe Ayurveda Super Speciality Kidney Care Center, Pimpri Pune येथे आयुर्वेद पंचकर्म उपचारां सोबत ckd रुग्णांवर काम करत आहेत.) Ayurved, Ayurvedic, CKD, Healthy Life With Ayurveda by shriayurvedic01@gmail.com 0 Comments ckd kidney RFT READ MORE